मंगळवार, १७ मे, २०११

विसरलेल्या वळणावरती हरवलेल्या आठवणींना
नव्याने ओळख करून द्यावी म्हणतो....
अलगद हळूच मनातल्या त्या नाजूक कप्प्यांना ...
प्रेमाची जाणीव करून द्यावी म्हणतो....
विसरून गेलेत काही माझ्याजवळ
त्यांना त्यांच्या मित्राशी भेट करून देईन म्हणतो...
जाता जाता एक तरी सुखद क्षण
आठवांचा ओंजळीत त्यांच्या सुपूर्त आज करतो...

-मी शब्दसखा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा